Skip to main content

गुगल झाले २० वर्षांचे

गुगल जन्मदिन
Happy Birthday Google

            गुगल आता २० वर्षाचे झाले आहे. गुगल तयार होण्याच्या इतिहास अत्यंत रोचक आहे. लॅरी पेज यांच्या बॅकरब प्रकल्पाचे नाव बदलून गुगल करण्यात आले होते.

 गुगोल शब्दापासून बनवला गुगल

             सर्जेई ब्रिन आणि  पेज स्टॅनफोर्ड विद्यापिठाच्या डॉरमेट्री मध्ये एकत्र राहत होते. त्यांच्या खोलीत त्यांनी अनेक कॉम्प्युटर खरेदी करून जमा केले होते. त्याच ठिकाणी त्यांनी संशोधन प्रकल्प म्हणून सर्च इंजिन बनवले. त्यावेळी इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी प्रत्येक पेजवर त्याची लिंक पाहावी लागत होती. त्यामुळे ब्रिन आणि यांचा हा प्रकल्प अत्यंत लोकप्रिय झाला. त्यावेळी त्यांनी पीएचडीचे शिक्षण मधेच सोडून यावर काम करण्यास सुरुवात केली.


           सुरुवातीला लारी पेज यांच्या "बॅकरब" नावाच्या याच प्रकल्पावर काम सुरू होते. ऑगस्ट १९९६ मध्ये त्याचे नाव बदलून गुगल ठेवण्यात आले. हे नाव त्यांनी "गुगोल" शब्दापासून घेतले आहे. या शब्दाचा अर्थ १० वर १०० चा घात असा होतो. याचा पहिला व्हर्जन स्टॅनफोर्ड च्या साइटवर दिसले होते. ते या दोघांनी अनेक कॉम्प्युटर जोडून बनवले होते. मात्र, ही प्रणाली इतकी जास्त बँडविथवर चालायची की स्टॅनफोर्डचे बाकी इंटरनेट कनेक्शन बंद होत होते.

याहूला विक्री करण्याची होती इच्छा

              पेज आणि ब्रिन यांनी १९९८ मध्ये सर्च इंजिन याहुला गुगल विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते जमले नाही. १९९९ मध्ये दोघांनी एक्साईट नावाच्या कंपनीलाही विक्रीचा प्रयत्न केला. त्यावेळी एक्साईट याहू नंतर दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन होते. त्यांनी गुगलसाठी १० लाख डॉलर (त्यावेळी ४ कोटी रुपये) मागितले होते. मात्र कंपनी तयार होत नसल्याचे पाहून त्यांनी किंमत कमी करून ७.५  लाख डॉलर (३ कोटी रुपये) केली. तरी देखील एक्साईटचे सीईओ जॉर्ज बेल आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट विनोद खोसला यांनी या कराराला मंजुरी दिली नाही. आज गुगलचे मूल्य ५९ लाख कोटी रुपये आहे.


Comments

Popular posts from this blog

पतंजलीने बीएसएनएल सोबत हात मिळवणी करत, लाँच केले स्वदेशी सिम कार्ड प्लॅन

            योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने भारत संचार निगम लिमिटेड बरोबर हात मिळवणी करून दूरसंचार क्षेत्रात योजना आखली आहे. या योजनेला " स्वदेशी समृद्धी कार्ड " असे नाव देण्यात आले आहे. सध्या सुरुवातीला हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. तर जाणून घेऊयात काय आहे बीएसएनल व पतंजलीचा "स्वदेशी समुर्द्धि प्लॅन" ? काय आहे प्लॅन..? १) १४४ रु., ३० दिवस : या मध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच ३० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. २) ७९२ रु., १८० दिवस : या मध्ये ७९२ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ३) १५८४ रु., ३६५ दिवस : या मध्ये १५८४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच १८० दिवसांकरिता प्रती दिन २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. ...